Wednesday, July 17, 2013

ग्रेस, 
(माणिक सीतारामपंत गोडघाटे)
सादर प्रणाम,
पुण्यात होतो. आणि तेही एक दिवसा साठी. काम आठवत नाही पण होतो. पुण्यात असल्यावर नाटक, संगीत, अन्य काय काय मैफिल आहेत हे पाहण्याचा नाद. त्या साठी सर्वच वृतपत्रे चाळणे हा पुण्यात उतरलो कि, सकाळ सकाळचा उद्योग. वृतपत्र हाती घेतले, चाळले. बालगंधर्व ला कांही तरी विशेष होते. दुपारी तिकडे गेलो. तारीख नक्की आठवते ४ फेब्रुवारी २०१२. अचानक माझा मित्र भेटला. अरे तू ग्रेस यांना भेटायला आलास ना? मी विस्मयकारक होवून त्याच्या कडे पहिले आणि पुढे तो म्हणाला ‘दिनानाथ’ मध्ये सर आहेत. 

कर्क रोगाने तुम्हाला पछाडले आहे. हे मला समजले होतेच. पण अश्यात अलीकडे मी तुम्हाला फोन केला नव्हता, पण तुम्ही आजारी आहात हे जेंव्हा मला समजले त्यानंतर माझे तुम्हाला फोन करण्याचे धाडस झाले नाही. पण आज पुण्यात आहात असे कळले आणि लगेच मोबाईल लावला. तुमची वेळ घेतली आणि तडक “दिनानाथ” गाठ्ले. शेवटच्या मजल्यावर विशेष अतिथी कक्ष्यात आलो, चौकशी करावी म्हणून पुढे सरकलो, तर उजव्या हाताला रूम उघडी होती आणि तिथे तुमचा एक फोटो लावलेला दिसला. हीच रूम असणार. डोकावून सरळ आत आलो. तुम्ही मला पाहताच नेहमीच्या आवाजात “काय महाराज २ वर्ष झाली फोन नाही, नागपूर ला आलात नाहीत का अश्यात? आणि बसण्याची सूचना केलीत. मी आतून खूप घाबरून गेलो होतो, तुमचा चेहरा, शरीर, डोळे, रंग सारे सारे बदलून गेले होते. तुम्हीच ‘ग्रेस’ आहात का? असा प्रश्न मनात पडावा इतका बदल तुमच्यात झाला होता. थोडेसे बोलणे झाले. आणि एकदम निरव शांतता पसरली. मी बोललो नाही. आणि तुम्ही एका पायावर आडी टाकून घुड्घ्यावर दोन्ही हात एकमेकांवर ठेवून कसल्या तरी गहन चिंतनात गुंतलात. हातात कसल्याश्या धातूंचे कंगन, मनगटात माळ आणि गळ्यातही असेच कांही असावे. मी स्तब्ध. तुमच्या त्या दिनानाथ हॉस्पिटलच्या स्पेशल रूम वर, मागे, पुढे नजर टाकली. भिंतीवर तुमच्या अनेक विविध भावमुद्रा असलेल्या प्रतिमा लावलेल्या, तुमची अनेक पुस्तके कपाटात लावलेली होती. तुम्हाला दिसतील आणि सारखी पाहता येतील अश्या बेताने ठेवलेली. डाव्या बाजूला तुमचे सहोदर,जीवश्यच,कंठश्च मित्र पं.हृदयनाथ मंगेशकर यांचा फोटोही लटकवलेला होता. हे पाहताक्षणी हे नागपुरातले घर आहे? असा भास थोडा वेळ झाला. चहा मागवला गेला, थोड बोलण आणि पुन्हा कसल्या तरी विचारात गुंतण अस चालू होत तुमच. मी स्तब्धच होतो. मला काय बोलावे कांहीच सुचत नव्हते. आणि नाही तरी मी जेंव्हा तुम्हाला बोलतो, तेंव्हा जुजबीच बोलत होतो, आणि साहित्य बाह्य. ‘ओल्या वेळूची बासरी’ तुमचे पुस्तक प्रकाशित होणार होते. तुम्ही मुद्रण तपासणीच्या कामात असलेल्या कोणाला तरी फोन वर बोलत होता, “ अरे माझे दिवस किती राहिले, लवकर लवकर आटोपा ३ दिवसात मला सगळे अंतिम प्रुफ हवे आहे, दिल्लीहून आलो कि लगेच ते प्रकाशित करायचे आहे”...तुम्ही फोन ठेवलात आणि माझ्या कडे वळून म्हणालात ‘लोमटे महाराज साहित्य अकादमी चा पुरस्कार जाहीर झालाय आणि या लोकांना आता उतार वयात सुचले पुरस्कार देण्याला, मी लिहिले ते काय कुठल्या पुरस्कार साठी? असा प्रश्न करून तुम्ही तुमच्या कलाकृतींवर बोलत राहिलात जे माझ्या आकलनाच्या पलीकडले होते. मधेच शांतता होती, आणि मग कालांतराने मला प्रश्न केलात, ‘तुम्हाला जर वेळ मिळाला तर माझ्या सोबत दिल्लीला याल का’? साहित्य अकादमीचा पुरस्कार घेण्यास जायचे आहे. हृदयनाथ ने कोणाला तरी सांगितले आहे सोबत यायला पण त्याचा होकार आणखी आला नाही. तो जर आला नाही तर तुम्हाला मी फोन करतो. तुम्ही चला दिल्लीला माझ्या सोबत. मी म्हणालो आनंदाने येतो मला कळवा, किंवा जो येणार आहे त्याला सांगून टाका कि तू येवू नकोस म्हणून. तुम्ही म्हणालात, पण हृदयनाथने सांगितले आहे. त्याचा निरोप येवू द्या मग पाहू...... एक तास कसा गेला कळले नाही.... मी निरोप घेतला आणि फोन ची वाट पाहीन असे सांगून खाली उतरलो. ‘दिनानाथ’ सोडले, खाली उतरून त्या इमारतीच्या उंचीकडे खिन्न मनाने पाहत होतो, मनात पुटपुटलो ......किती सहज मी तुम्हाला भेटलो. तास गेला, आणि मला दिल्ली ला सोबत येण्याचे निमंत्रण.......मी बराच वेळ हवेत होतो.......इमारती उंच असून काय उपयोग माणूस उंच असयला हवा, तुमच्या उंचीचा, ज्याला मनाचा ठाव कळला, स्वतःची उंची कळलेली, आणि कुणाच्याही उंचीची तमा नसलेले तुम्ही ग्रेस... होय ग्रेसच. 
हळूच माझ्या डोळ्यात तुम्हाला पहिला फोन केलेला आणि २००२ साली पहिल्यांदा भेटलो तो दिवस चमकून गेला. अंबाजोगाईला यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह दरवर्षी होतो त्यात तुम्ही कवी संमेलनात यावे असे संयोजाकना वाटत होतो, संपर्क झाला, पण तुमचा होकार येण्या आधीच तुमचे नाव पत्रिकेत छापले गेले. दासू वैद्य या कवी संमेलनाचे सूत्र संचलन करणार होते. पण तुम्ही आला नाहीत, तुम्ही निघालात कि नाही? हे विचारावे म्हणून मी तुम्हाला फोन केला आणि मग समजले कि तुम्ही यायला नकार दिला होता आणि तो ही स्पष्ट पणे. “मी कवी संमेलनाचा कवी नाही. मी कवी संमेलनाला जात नाही”. हे आवर्जून सांगितले. पण कांही तरी गडबड झाली आणि चुकून तुमचे नाव पत्रिकेत छापले गेले होते. त्यावेळी तुम्ही चार गोष्ठी सुनावल्या होत्या. मी संयोजकांच्या वतीने माफी मागितली, नंतर २००२ साली प्रख्यात साहित्यिक प्र. ई. सोनकांबळे यांचा मुलाचे डॉ. अश्विनचे लग्न नागपूरला होते. त्यानिमित्य मी नागपूरला आलो होतो. जाताना तुम्हाला भेटायचे आहे हे ठरवून निघलो. नागपूरला आल्यावर तुम्हाला फोन केला आणि भेटण्याची वेळ ठरवून घेतली. सायंकाळी ५ वाजता भेट ठरली होती. तुमच्या साहित्या बद्दल खूप चर्चा, मत-मतांतरे, होती. दुर्बोधतेचा आरोप तर प्रचलीत होता. पण स्वच्छंदी जगणारे आणि लिहिणारे ‘ग्रेस’ यांची भेट म्हणजे माझ्यासाठी तो दिवस ग्रेट होता. तुमच्या बद्दल अफवाही खूप होत्या. ग्रेस हे कोणालाच निट बोलत नाहीत, तावातावाने बोलतात. वगैरे वगैरे. मी गेलो सोबत माझा मुलगा अभिजित, भाऊ दीपक हे पण होते.. मी त्या लोकमत चौकाजवळील तुम्ही सांगितलेल्या इमारतीत मध्ये भेटायला आलो. तर दाराजवळच्या भिंतीवर लिहिले होते. “I am Free but not available” हे वाचून मी प्रथम आवाक झालो, पण भेटण्याची तिव्र इच्छा. मी भित भित बेल वाजवली... आणि तुम्ही कदाचित माझीच वाट पाहात असावेत. या या दगडूशेठ अस म्हणत तुम्ही दरवाजा उघडला आणि म्हणालात माझ्या नागपुरात दंत कथा भरपूर आहेत. मी भेट घेणाऱ्याला रागावतो, मारतो, हुसकावून लावतो, वगैरे वगैरे. तस कांही वाटत असेल तर तुम्ही लगेच जावू शकता. पण मी नम्रपणे म्हटले तसे असते तर मी आलोच नसतो. मला तुम्हाला पहायचे होते आणि प्रत्येक्ष भेटायचे होते. पूर्वी मी तुमच चर्चबेल, चंद्र माधवीचे प्रदेश, मितवा, संध्याकाळच्या कविता, सांध्यपर्वातील वैष्णवी, मृगजळाचे बांधकाम, इतर कांही वाचले होते. तुमचे साहित्य हे जे समजले ते माझे, नाही समजले ते अकलनापलीकडले आहे हे नम्र पणे सांगतो. ‘ती गेली तेंव्हा पाऊस निनादात होता’, ‘भयं इथले संपत नाही’ ही चंद्रकांत काळे यांनी निर्मिलेली ’साजणवेळा’ आणि इतर गीते आईक्लेली होती. आणि तुमच्या या गीतामुळे मी भारावलेलो होतो. तुमचे कांही लिखाण सामना मधून वाचलेले होते. तेवढाच धागा होता. पण खूप मोकळे बोललात, मधेच इंग्रजी बोलत होतात.. पण मी तुम्हाला मला इंग्रजी येत नाही हे सांगण्याचे धाडस केले नाही. ३ तास होतो, मधेच तुम्हाला फोन यायचा त्यात अर्धा तास तरी जायचा, घरात कोणही नव्हते त्यामुळे पाणी तुम्हीच आणून दिले. भित भित तुम्हाला मी म्हणालो, मला तुमच्या कविता फार आवडतात, तर मी काय करू शकतो मग? सगळ्यांनाच आवडतात. किंव्हा नाहीत आवडत. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हे तुमचे सरळ बोलणे. तुम्ही फोनवर जेंव्हा बोलत होता तेंव्हा तुमच्याच साहित्याचेच बोलत होता. आणि भाषा, उच्चार, भेदक वाक्य रचना, आणि सरळ सरळ अस्खलित इंग्रजी. बापरे. मी थक्क झालो. या भेटीत तुमची कायम ओळख आणि संपर्क ठेवू असे ठरवून गेलो होतो. या भेटी दरम्यान परभणीच्या (पण आता ठाण्यात असलेल्या) अंजली आंबेकर ह्या शिक्षण अधिकारी होत्या, तुमच्या साहित्यावर त्या विलक्षण प्रेम करीत होत्या. त्यांचा तुम्हाला फोन आला आणि त्या कांही तुमच्या साहित्यावर लिहीत होत्या आणि तुमच्या साहित्याची कांही महत्वाची कात्रणे त्यांना हवी होती. तुम्ही मला परभणी किती जवळ आहे? हे विचारले आणि मला परभणीहूनच जावे लागते. असे सांगितल्यावर ती कागदपत्रे तुम्ही माझ्या कडे दिलेत. आणि सांगितले हे तु नक्की दे. नंतर अंजली आंबेकर यांचे आणि माझी मैत्री खूप छ्यान झाली. त्यांनीच मला ‘संध्यासुक्तांचा यात्रिक’ हि सीडी मिळवून दिली....मी तर खुश झालो. तुमच्याशी जवळीक साधण्याची संधी होती. तुमच्या सोबत फोटो घेवू का? असा प्रश्न करताच त्यांनी लगेच जवळ बोलावले आणि अविस्मरणीय क्षण मी टिपून घेतला. 

माझ्या भेटीत तुला काय वाईट अनुभव आला? असा प्रश्न तुम्ही केलात आणि मी नकारार्थी उत्तर दिले....तुम्ही दिलेली फाईल घेवून मी निघालो. आणि तळघरा पर्यंत तुम्ही मला सोडायला आलात. आणि पुढच्या भेटीचे निमंत्रण पण दिले. नम्रता, विनयशीलता, पाहुण्याला कसे बोलावे, वागवावे, हे जणू तुम्ही शिकवत आहात असा भास...पण माणूस म्हणून तर पहिल्याच भेटीत तुम्ही मला अत्यंत आवडलात. तुमच्या बोलण्यातून दु:खाची, विरहाची आर्तता, विचारांची खोली, घरात एकटे, घर स्वतःच्या प्रतिमांनी भरलेले, अनेक छटा असलेल मोठी मोठी तुमचीच पेंटिग्ज, आधुनिक जगात वेगळाच ज्ञानाचा दिवा हतात घेतल्याचा भास मला तेंव्हा झाला. एकाकीपणाचे जगणे घरभर दिसत होते, उद्विग्नता बोलण्यातून जाणवत होती. आणि छोट्या कवितेचा तुकडा तुम्ही एका लयीत म्हणून दाखवलात. तो क्षण आजही माझ्या अंगावर शहारा आणतो, माझ्यासाठी तो एक मोठा सन्मान होता. ही तुमची माझी पहिली भेट. तुमच्या जवळ असलेल्या ज्ञानाचा, आणि साहित्याचा अहंकार पहिल्या भेटीत नाही जाणवला पण नंतर भेटत गेलो आणि स्वतःच जगण, लिखाण, शैली, भाषा, मी इतरान पेक्षा वेगळा कवी - साहित्यिक आहे याची जाणीव मला होत राहिली.. स्वछंदी असण आणि अहंकार असण यातला फरक मला जाणवू लागला. “मी माझा उपयोग कोण्या साहित्यबाह्य माणसाला, अथवा संस्थेला होवू देणार नाही, मी माझ्या पद्धतीने कार्यक्रम करतो, आणि करून घेतो”. ही भाषा आज ही माझ्या कानात घुमते आहे.. पण तुमचे बोलणे आणि लिखाण हे अति उच्च पातळीवरचे. स्वतःच्या लिखाणाचा गर्व होता, माज नव्हता, राघव, रामदास, हृदयनाथ, सुभास, ही नावे सतत येत होती. तुमच्या देहबोलीत स्वतःच्या तत्वज्ञानाचा असर जाणवत होताच, एक लय होती. ‘मोर तुरा काढून नाचतो आहे’ असा मला उगीच भास तुमच्या त्या हावभाव व बोलण्यावरून झाला. मी इतरांसारखा नाही. माझे लिखाण समजायला शतकानुशतके लागतील, असे म्हणत आहेत असाच भास होत होता. पण माझे तुमच्या व्यक्तीमत्वात काय काय आणखी मिळेल याकडे लक्ष होते. नंतर १ महिना, १५ दिवसाला फोनवर भेटत राहिलो. १ दा खूप दिवस फोन गेला नाही ६ महिन्याचा कलावधी असावा. अचानक सायंकाळी तुमचाच फोन, काय लोमटे महाराज, पुण्याला १ श्रीमंत दगडूशेठ, आहेत तुम्ही आमचे साधे दगडूशेठ आहात. भेटा खूप दिवस झाले. प्रत्यक्ष भेट नाहीच. किमान फोन तरी करावा. “एक तर तर लळा लावू नये आणि लावला तर टाळू नये’ हे वाक्य आणखीही आठवते मला. मध्यंतरी २००९ - १०, भेटलोच नाहीत. पण २०११ मध्ये मी नागपूरला कांही कामानिमित्त गेलो पण तुम्ही १ दिवस आधीच पुण्याला गेला होतात. तुमच्या बद्दल कोणाचे कांहीही मत असले तरी. माणूस म्हणून तुम्ही जे प्रेम दिले ते शब्दाच्या बाहेर होते.स्वतःच्या निर्मितीवर आनंदी असणारे तुम्ही. 

“मी महाकवी दुःखाचा
प्राचीन नदीपरि खोल
दगडाचे माझ्या हाती 
वेगाने होते फुल”

असे लिहिणारे तुम्ही पण मन मेणाहुनी मऊ आणि प्रसंगी कणखर झालेले अनुभवले आहे. दु:ख, आणि दु:ख तुमच्या जन्मा पासून ते मृत्यू पर्यंत सोबत होते म्हणून तुम्ही सुंदर जीवन जगलात असे मला वाटते. माणूस म्हणून, साहित्यिक आणि कलावंत म्हणूनही तुमचे जगणे श्रीमंत होते. 

“मी माझा, माझ्या भाषेचा भूतकाळ, तिचा इतिहास मिटवत नाही, पुसून टाकत नाहीये पण त्याच बरोबर भविष्यकाळाचा उरबडव्या विदुषकही मी होणार नाही.” (मृगजळाचे बांधकाम – पेज १४७) तुम्हाला दुर्बोध समजणाऱ्या लोकांना मराठी भाषेचे, तिच्या भविष्याचे किती भान होते ते या २ ओळीतून स्पष्ट जाणवते.

असतेच आपुले गाव आतल्या तिळाहुनि खोल
मी पुन्हा घराला आलो परतीचे घेवून बोल. 
किंवा ..
चल आज घराला पाहू तू नसलीस म्हणुनी काय
मृत्यू मढवुनि देतो हळदीचे स्वस्तिक पाय ......(सांध्यपर्वातील वैष्णवी – ११३)

असे नाजूक हळुवार होणारे तुम्ही.....
घन जमतील तेव्हा जमतील, वाऱ्याचे अलगुज खोटे ;
हे दुःख मिठीचे तोवर हाडांना घेवून पेटे.....(वाऱ्याने हलते रान – ६८)

असे कणखर होतानाही दिसतात. ही तुमची चलबिचल जशी लिहिण्यात आहे तशी प्रत्येक्ष जगण्यातही जाणवते. राघव, मिथिला, आणि माधवी चे नाव कित्येक वेळा लिहिताना, बोलताना येते तेंव्हा तुम्ही व्याकूळ होताना दिसलात. कांही नावे सारखी तुमच्या तोंडून येत असत त्यात, रामदास भटकळ, हृदयनाथ, लताबाई, आशाताई, सुभाष अवचट, चंद्रकांत काळे, राघव, मिथीला, माधवी आणि कोणीकोणी. आपल्याच लिखाणावर बोलताना किती आवेगाने बोलत असत तुम्ही. तुम्हाला प्रत्यक्ष आयकावे म्हणून तुम्हाला सांगितले होते कि, तुम्ही कुठे मराठवाड्यात आलात कि सांगा मला जाहीर कार्यक्रमात मला यायचे आहे. योगायोगाने आपली नागपूर भेटी नंतर ३ वर्षांनी सोलापूरला भेटण्याचा योग आला. शंकरराव मोहिते यांच्या नावे पुरस्कार वितरण होते. तिथे मुद्दाम मी आलो होतो. त्र्य. वि. सरदेशमुख यांच्या आग्रहाखातर तुम्ही हा साहित्य पुरस्कार स्वीकारलात. अंबरीश मिश्र आणि स्वत:हा त्र्य. वि. सरदेशमुख यांना पण त्यात पुरस्कार होते. तुमचे ते आवेश पूर्ण भाषण आईकून मी थक्क झालो. तुम्हाला धाप लागलेली. तुमची मांडणी कित्येकांना पटली किंवा नाही कि समजलेच नाही ही शंकाच. तुम्हाला अंबाजोगाईला बोलावणे जमले नाही पण तुम्ही चंद्रकांत काळे यांचा “साजणवेळा” हा कार्यक्रम घ्या. असे सुचवले. तसे तुम्ही काळे व माझे बोलणेही करून दिले. मी आणि हृदयनाथ मंगेशकर दोघेही अंबाजोगाईला येवून माझ्या कवितेचा कार्यकम करतो. तुम्ही हृदयनाथ यांच्याशी संपर्कात रहा, पण तेही जमले नाही. तुम्ही गेला. आणि मग त्याच वर्षी नोव्हेंबर २०१२ च्या “यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात, चंद्रकांत काळे यांना बोलावले आणि तुमच्या कवितांचा “साजणवेळा” हा कार्यक्रम केला. हा कार्यक्रम चालू होता. तोच वाद्यवृंद, पं.आनंद मोडक, चंद्रकांत काळे, आणि त्यांचा चमू, धीरगंभीर पणे सगळे चालू होते लोक दाद देत होते, कधी शब्दांना, कधी रचनेला, कधी गायकीला, कधी काळे यांच्या निवेदनाला....पण माझे मन मात्र पुन्हा तुमच्या शेवटच्या ‘दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल’ मधल्या भेटीकडे गेले, ...तुम्ही साहित्य अकादमीचा पुरस्कार घेवून आलात. फोनवर दोनच शब्द बोललो, सर अभिनंदन!! आणि तुमचा आवाज इतका क्षीण होता कि, काळजाचा ठाव चुकला... हो, चुकलाच! तुम्ही फेब्रुवारीत तो पुरस्कार घेतला आणि मार्च २६ ला बातम्यात कळले, मराठीतील महान कवी ग्रेस गेले. मी गडबडीने चंद्रकांत काळेना फोन केला. तेंव्हा त्यानाही कळले नव्हते. मी म्हटले त्यांचा अंत्यविधी कुठे करणार एवढे कळवा. त्यानाही अंदाज आला नाही. मी पुण्याच्या दिशेने निघालो आणि तुमचा अखेरचा प्रबास नागपूरच्या दिशेने. मला कळलेच नाही काय करावे. तुमच्या शिवाय कोणी ओळखीचे नव्हते. जेंव्हा भेट झाले तेंव्हा तुम्ही एकटेच. पण तुमचे कांही मित्र माझे झाले होते. पुण्यात पावूल टाकले आणि बातम्या पहिल्या कवी ग्रेस यांचे नागपुरात अंत्यविधी होणार. माझी दिशा चुकली होती.आणि नागपूरला पोहचणे शक्य नव्हते. सायंकाळ, साजणवेळा, सांध्य, दिवेलागण, असे साम्य शब्द कानात पडत होते कितीं प्रिय शब्द होते ते तुम्हाला आणि किती प्रिय होते सूर्याचे अस्ताला जाणे आणि परत उगवणे. पण आज सूर्य काजळी लेवून गेला तो न परतण्या साठी. ....

मी भानावर आलो, अम्बाजोगाईचा कार्यक्रम संपत आला होता.. 
भय इथले संपत नाही....... 
ती गेली तेंव्हा रिम झिम पाउस निनादात होता....
कसल्या दु:खाने सुचते हे गाणे...
आणि मग शेवटचे ...गीत मुकुंद फणसळकर यांच्या गंभीर आवाजात....
उठा दया घना लावा निरांजने. देहातले सोने काळे झाले.......!!
माझ्या डोळ्यात तुमची दिनानाथ मधली मूर्ती स्पष्ट पणे बोलतच आहे असा भास...हो, तो भासच होता....
या पुन्हा परत एवढेच सांगतो....
तुमचा 
दगडू लोमटे

ग्रेस, 
(माणिक सीतारामपंत गोडघाटे)
सादर प्रणाम,
पुण्यात होतो. आणि तेही एक दिवसा साठी. काम आठवत नाही पण होतो. पुण्यात असल्यावर नाटक, संगीत, अन्य काय काय मैफिल आहेत हे पाहण्याचा नाद. त्या साठी सर्वच वृतपत्रे चाळणे हा पुण्यात उतरलो कि, सकाळ सकाळचा उद्योग. वृतपत्र हाती घेतले, चाळले. बालगंधर्व ला कांही तरी विशेष होते. दुपारी तिकडे गेलो. तारीख नक्की आठवते ४ फेब्रुवारी २०१२. अचानक माझा मित्र भेटला. अरे तू ग्रेस यांना भेटायला आलास ना? मी विस्मयकारक होवून त्याच्या कडे पहिले आणि पुढे तो म्हणाला ‘दिनानाथ’ मध्ये सर आहेत.

कर्क रोगाने तुम्हाला पछाडले आहे. हे मला समजले होतेच. पण अश्यात अलीकडे मी तुम्हाला फोन केला नव्हता, पण तुम्ही आजारी आहात हे जेंव्हा मला समजले त्यानंतर माझे तुम्हाला फोन करण्याचे धाडस झाले नाही. पण आज पुण्यात आहात असे कळले आणि लगेच मोबाईल लावला. तुमची वेळ घेतली आणि तडक “दिनानाथ” गाठ्ले. शेवटच्या मजल्यावर विशेष अतिथी कक्ष्यात आलो, चौकशी करावी म्हणून पुढे सरकलो, तर उजव्या हाताला रूम उघडी होती आणि तिथे तुमचा एक फोटो लावलेला दिसला. हीच रूम असणार. डोकावून सरळ आत आलो. तुम्ही मला पाहताच नेहमीच्या आवाजात “काय महाराज २ वर्ष झाली फोन नाही, नागपूर ला आलात नाहीत का अश्यात? आणि बसण्याची सूचना केलीत. मी आतून खूप घाबरून गेलो होतो, तुमचा चेहरा, शरीर, डोळे, रंग सारे सारे बदलून गेले होते. तुम्हीच ‘ग्रेस’ आहात का? असा प्रश्न मनात पडावा इतका बदल तुमच्यात झाला होता. थोडेसे बोलणे झाले. आणि एकदम निरव शांतता पसरली. मी बोललो नाही. आणि तुम्ही एका पायावर आडी टाकून घुड्घ्यावर दोन्ही हात एकमेकांवर ठेवून कसल्या तरी गहन चिंतनात गुंतलात. हातात कसल्याश्या धातूंचे कंगन, मनगटात माळ आणि गळ्यातही असेच कांही असावे. मी स्तब्ध. तुमच्या त्या दिनानाथ हॉस्पिटलच्या स्पेशल रूम वर, मागे, पुढे नजर टाकली. भिंतीवर तुमच्या अनेक विविध भावमुद्रा असलेल्या प्रतिमा लावलेल्या, तुमची अनेक पुस्तके कपाटात लावलेली होती. तुम्हाला दिसतील आणि सारखी पाहता येतील अश्या बेताने ठेवलेली. डाव्या बाजूला तुमचे सहोदर,जीवश्यच,कंठश्च मित्र पं.हृदयनाथ मंगेशकर यांचा फोटोही लटकवलेला होता. हे पाहताक्षणी हे नागपुरातले घर आहे? असा भास थोडा वेळ झाला. चहा मागवला गेला, थोड बोलण आणि पुन्हा कसल्या तरी विचारात गुंतण अस चालू होत तुमच. मी स्तब्धच होतो. मला काय बोलावे कांहीच सुचत नव्हते. आणि नाही तरी मी जेंव्हा तुम्हाला बोलतो, तेंव्हा जुजबीच बोलत होतो, आणि साहित्य बाह्य. ‘ओल्या वेळूची बासरी’ तुमचे पुस्तक प्रकाशित होणार होते. तुम्ही मुद्रण तपासणीच्या कामात असलेल्या कोणाला तरी फोन वर बोलत होता, “ अरे माझे दिवस किती राहिले, लवकर लवकर आटोपा ३ दिवसात मला सगळे अंतिम प्रुफ हवे आहे, दिल्लीहून आलो कि लगेच ते प्रकाशित करायचे आहे”...तुम्ही फोन ठेवलात आणि माझ्या कडे वळून म्हणालात ‘लोमटे महाराज साहित्य अकादमी चा पुरस्कार जाहीर झालाय आणि या लोकांना आता उतार वयात सुचले पुरस्कार देण्याला, मी लिहिले ते काय कुठल्या पुरस्कार साठी? असा प्रश्न करून तुम्ही तुमच्या कलाकृतींवर बोलत राहिलात जे माझ्या आकलनाच्या पलीकडले होते. मधेच शांतता होती, आणि मग कालांतराने मला प्रश्न केलात, ‘तुम्हाला जर वेळ मिळाला तर माझ्या सोबत दिल्लीला याल का’? साहित्य अकादमीचा पुरस्कार घेण्यास जायचे आहे. हृदयनाथ ने कोणाला तरी सांगितले आहे सोबत यायला पण त्याचा होकार आणखी आला नाही. तो जर आला नाही तर तुम्हाला मी फोन करतो. तुम्ही चला दिल्लीला माझ्या सोबत. मी म्हणालो आनंदाने येतो मला कळवा, किंवा जो येणार आहे त्याला सांगून टाका कि तू येवू नकोस म्हणून. तुम्ही म्हणालात, पण हृदयनाथने सांगितले आहे. त्याचा निरोप येवू द्या मग पाहू...... एक तास कसा गेला कळले नाही.... मी निरोप घेतला आणि फोन ची वाट पाहीन असे सांगून खाली उतरलो. ‘दिनानाथ’ सोडले, खाली उतरून त्या इमारतीच्या उंचीकडे खिन्न मनाने पाहत होतो, मनात पुटपुटलो ......किती सहज मी तुम्हाला भेटलो. तास गेला, आणि मला दिल्ली ला सोबत येण्याचे निमंत्रण.......मी बराच वेळ हवेत होतो.......इमारती उंच असून काय उपयोग माणूस उंच असयला हवा, तुमच्या उंचीचा, ज्याला मनाचा ठाव कळला, स्वतःची उंची कळलेली, आणि कुणाच्याही उंचीची तमा नसलेले तुम्ही ग्रेस... होय ग्रेसच.
हळूच माझ्या डोळ्यात तुम्हाला पहिला फोन केलेला आणि २००२ साली पहिल्यांदा भेटलो तो दिवस चमकून गेला. अंबाजोगाईला यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह दरवर्षी होतो त्यात तुम्ही कवी संमेलनात यावे असे संयोजाकना वाटत होतो, संपर्क झाला, पण तुमचा होकार येण्या आधीच तुमचे नाव पत्रिकेत छापले गेले. दासू वैद्य या कवी संमेलनाचे सूत्र संचलन करणार होते. पण तुम्ही आला नाहीत, तुम्ही निघालात कि नाही? हे विचारावे म्हणून मी तुम्हाला फोन केला आणि मग समजले कि तुम्ही यायला नकार दिला होता आणि तो ही स्पष्ट पणे. “मी कवी संमेलनाचा कवी नाही. मी कवी संमेलनाला जात नाही”. हे आवर्जून सांगितले. पण कांही तरी गडबड झाली आणि चुकून तुमचे नाव पत्रिकेत छापले गेले होते. त्यावेळी तुम्ही चार गोष्ठी सुनावल्या होत्या. मी संयोजकांच्या वतीने माफी मागितली, नंतर २००२ साली प्रख्यात साहित्यिक प्र. ई. सोनकांबळे यांचा मुलाचे डॉ. अश्विनचे लग्न नागपूरला होते. त्यानिमित्य मी नागपूरला आलो होतो. जाताना तुम्हाला भेटायचे आहे हे ठरवून निघलो. नागपूरला आल्यावर तुम्हाला फोन केला आणि भेटण्याची वेळ ठरवून घेतली. सायंकाळी ५ वाजता भेट ठरली होती. तुमच्या साहित्या बद्दल खूप चर्चा, मत-मतांतरे, होती. दुर्बोधतेचा आरोप तर प्रचलीत होता. पण स्वच्छंदी जगणारे आणि लिहिणारे ‘ग्रेस’ यांची भेट म्हणजे माझ्यासाठी तो दिवस ग्रेट होता. तुमच्या बद्दल अफवाही खूप होत्या. ग्रेस हे कोणालाच निट बोलत नाहीत, तावातावाने बोलतात. वगैरे वगैरे. मी गेलो सोबत माझा मुलगा अभिजित, भाऊ दीपक हे पण होते.. मी त्या लोकमत चौकाजवळील तुम्ही सांगितलेल्या इमारतीत मध्ये भेटायला आलो. तर दाराजवळच्या भिंतीवर लिहिले होते. “I am Free but not available” हे वाचून मी प्रथम आवाक झालो, पण भेटण्याची तिव्र इच्छा. मी भित भित बेल वाजवली... आणि तुम्ही कदाचित माझीच वाट पाहात असावेत. या या दगडूशेठ अस म्हणत तुम्ही दरवाजा उघडला आणि म्हणालात माझ्या नागपुरात दंत कथा भरपूर आहेत. मी भेट घेणाऱ्याला रागावतो, मारतो, हुसकावून लावतो, वगैरे वगैरे. तस कांही वाटत असेल तर तुम्ही लगेच जावू शकता. पण मी नम्रपणे म्हटले तसे असते तर मी आलोच नसतो. मला तुम्हाला पहायचे होते आणि प्रत्येक्ष भेटायचे होते. पूर्वी मी तुमच चर्चबेल, चंद्र माधवीचे प्रदेश, मितवा, संध्याकाळच्या कविता, सांध्यपर्वातील वैष्णवी, मृगजळाचे बांधकाम, इतर कांही वाचले होते. तुमचे साहित्य हे जे समजले ते माझे, नाही समजले ते अकलनापलीकडले आहे हे नम्र पणे सांगतो. ‘ती गेली तेंव्हा पाऊस निनादात होता’, ‘भयं इथले संपत नाही’ ही चंद्रकांत काळे यांनी निर्मिलेली ’साजणवेळा’ आणि इतर गीते आईक्लेली होती. आणि तुमच्या या गीतामुळे मी भारावलेलो होतो. तुमचे कांही लिखाण सामना मधून वाचलेले होते. तेवढाच धागा होता. पण खूप मोकळे बोललात, मधेच इंग्रजी बोलत होतात.. पण मी तुम्हाला मला इंग्रजी येत नाही हे सांगण्याचे धाडस केले नाही. ३ तास होतो, मधेच तुम्हाला फोन यायचा त्यात अर्धा तास तरी जायचा, घरात कोणही नव्हते त्यामुळे पाणी तुम्हीच आणून दिले. भित भित तुम्हाला मी म्हणालो, मला तुमच्या कविता फार आवडतात, तर मी काय करू शकतो मग? सगळ्यांनाच आवडतात. किंव्हा नाहीत आवडत. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हे तुमचे सरळ बोलणे. तुम्ही फोनवर जेंव्हा बोलत होता तेंव्हा तुमच्याच साहित्याचेच बोलत होता. आणि भाषा, उच्चार, भेदक वाक्य रचना, आणि सरळ सरळ अस्खलित इंग्रजी. बापरे. मी थक्क झालो. या भेटीत तुमची कायम ओळख आणि संपर्क ठेवू असे ठरवून गेलो होतो. या भेटी दरम्यान परभणीच्या (पण आता ठाण्यात असलेल्या) अंजली आंबेकर ह्या शिक्षण अधिकारी होत्या, तुमच्या साहित्यावर त्या विलक्षण प्रेम करीत होत्या. त्यांचा तुम्हाला फोन आला आणि त्या कांही तुमच्या साहित्यावर लिहीत होत्या आणि तुमच्या साहित्याची कांही महत्वाची कात्रणे त्यांना हवी होती. तुम्ही मला परभणी किती जवळ आहे? हे विचारले आणि मला परभणीहूनच जावे लागते. असे सांगितल्यावर ती कागदपत्रे तुम्ही माझ्या कडे दिलेत. आणि सांगितले हे तु नक्की दे. नंतर अंजली आंबेकर यांचे आणि माझी मैत्री खूप छ्यान झाली. त्यांनीच मला ‘संध्यासुक्तांचा यात्रिक’ हि सीडी मिळवून दिली....मी तर खुश झालो. तुमच्याशी जवळीक साधण्याची संधी होती. तुमच्या सोबत फोटो घेवू का? असा प्रश्न करताच त्यांनी लगेच जवळ बोलावले आणि अविस्मरणीय क्षण मी टिपून घेतला.

माझ्या भेटीत तुला काय वाईट अनुभव आला? असा प्रश्न तुम्ही केलात आणि मी नकारार्थी उत्तर दिले....तुम्ही दिलेली फाईल घेवून मी निघालो. आणि तळघरा पर्यंत तुम्ही मला सोडायला आलात. आणि पुढच्या भेटीचे निमंत्रण पण दिले. नम्रता, विनयशीलता, पाहुण्याला कसे बोलावे, वागवावे, हे जणू तुम्ही शिकवत आहात असा भास...पण माणूस म्हणून तर पहिल्याच भेटीत तुम्ही मला अत्यंत आवडलात. तुमच्या बोलण्यातून दु:खाची, विरहाची आर्तता, विचारांची खोली, घरात एकटे, घर स्वतःच्या प्रतिमांनी भरलेले, अनेक छटा असलेल मोठी मोठी तुमचीच पेंटिग्ज, आधुनिक जगात वेगळाच ज्ञानाचा दिवा हतात घेतल्याचा भास मला तेंव्हा झाला. एकाकीपणाचे जगणे घरभर दिसत होते, उद्विग्नता बोलण्यातून जाणवत होती. आणि छोट्या कवितेचा तुकडा तुम्ही एका लयीत म्हणून दाखवलात. तो क्षण आजही माझ्या अंगावर शहारा आणतो, माझ्यासाठी तो एक मोठा सन्मान होता. ही तुमची माझी पहिली भेट. तुमच्या जवळ असलेल्या ज्ञानाचा, आणि साहित्याचा अहंकार पहिल्या भेटीत नाही जाणवला पण नंतर भेटत गेलो आणि स्वतःच जगण, लिखाण, शैली, भाषा, मी इतरान पेक्षा वेगळा कवी - साहित्यिक आहे याची जाणीव मला होत राहिली.. स्वछंदी असण आणि अहंकार असण यातला फरक मला जाणवू लागला. “मी माझा उपयोग कोण्या साहित्यबाह्य माणसाला, अथवा संस्थेला होवू देणार नाही, मी माझ्या पद्धतीने कार्यक्रम करतो, आणि करून घेतो”. ही भाषा आज ही माझ्या कानात घुमते आहे.. पण तुमचे बोलणे आणि लिखाण हे अति उच्च पातळीवरचे. स्वतःच्या लिखाणाचा गर्व होता, माज नव्हता, राघव, रामदास, हृदयनाथ, सुभास, ही नावे सतत येत होती. तुमच्या देहबोलीत स्वतःच्या तत्वज्ञानाचा असर जाणवत होताच, एक लय होती. ‘मोर तुरा काढून नाचतो आहे’ असा मला उगीच भास तुमच्या त्या हावभाव व बोलण्यावरून झाला. मी इतरांसारखा नाही. माझे लिखाण समजायला शतकानुशतके लागतील, असे म्हणत आहेत असाच भास होत होता. पण माझे तुमच्या व्यक्तीमत्वात काय काय आणखी मिळेल याकडे लक्ष होते. नंतर १ महिना, १५ दिवसाला फोनवर भेटत राहिलो. १ दा खूप दिवस फोन गेला नाही ६ महिन्याचा कलावधी असावा. अचानक सायंकाळी तुमचाच फोन, काय लोमटे महाराज, पुण्याला १ श्रीमंत दगडूशेठ, आहेत तुम्ही आमचे साधे दगडूशेठ आहात. भेटा खूप दिवस झाले. प्रत्यक्ष भेट नाहीच. किमान फोन तरी करावा. “एक तर तर लळा लावू नये आणि लावला तर टाळू नये’ हे वाक्य आणखीही आठवते मला. मध्यंतरी २००९ - १०, भेटलोच नाहीत. पण २०११ मध्ये मी नागपूरला कांही कामानिमित्त गेलो पण तुम्ही १ दिवस आधीच पुण्याला गेला होतात. तुमच्या बद्दल कोणाचे कांहीही मत असले तरी. माणूस म्हणून तुम्ही जे प्रेम दिले ते शब्दाच्या बाहेर होते.स्वतःच्या निर्मितीवर आनंदी असणारे तुम्ही. 



“मी महाकवी दुःखाचा
प्राचीन नदीपरि खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फुल”

असे लिहिणारे तुम्ही पण मन मेणाहुनी मऊ आणि प्रसंगी कणखर झालेले अनुभवले आहे. दु:ख, आणि दु:ख तुमच्या जन्मा पासून ते मृत्यू पर्यंत सोबत होते म्हणून तुम्ही सुंदर जीवन जगलात असे मला वाटते. माणूस म्हणून, साहित्यिक आणि कलावंत म्हणूनही तुमचे जगणे श्रीमंत होते.

“मी माझा, माझ्या भाषेचा भूतकाळ, तिचा इतिहास मिटवत नाही, पुसून टाकत नाहीये पण त्याच बरोबर भविष्यकाळाचा उरबडव्या विदुषकही मी होणार नाही.” (मृगजळाचे बांधकाम – पेज १४७) तुम्हाला दुर्बोध समजणाऱ्या लोकांना मराठी भाषेचे, तिच्या भविष्याचे किती भान होते ते या २ ओळीतून स्पष्ट जाणवते.

असतेच आपुले गाव आतल्या तिळाहुनि खोल
मी पुन्हा घराला आलो परतीचे घेवून बोल.
किंवा ..
चल आज घराला पाहू तू नसलीस म्हणुनी काय
मृत्यू मढवुनि देतो हळदीचे स्वस्तिक पाय ......(सांध्यपर्वातील वैष्णवी – ११३)

असे नाजूक हळुवार होणारे तुम्ही.....
घन जमतील तेव्हा जमतील, वाऱ्याचे अलगुज खोटे ;
हे दुःख मिठीचे तोवर हाडांना घेवून पेटे.....(वाऱ्याने हलते रान – ६८)

असे कणखर होतानाही दिसतात. ही तुमची चलबिचल जशी लिहिण्यात आहे तशी प्रत्येक्ष जगण्यातही जाणवते. राघव, मिथिला, आणि माधवी चे नाव कित्येक वेळा लिहिताना, बोलताना येते तेंव्हा तुम्ही व्याकूळ होताना दिसलात. कांही नावे सारखी तुमच्या तोंडून येत असत त्यात, रामदास भटकळ, हृदयनाथ, लताबाई, आशाताई, सुभाष अवचट, चंद्रकांत काळे, राघव, मिथीला, माधवी आणि कोणीकोणी. आपल्याच लिखाणावर बोलताना किती आवेगाने बोलत असत तुम्ही. तुम्हाला प्रत्यक्ष आयकावे म्हणून तुम्हाला सांगितले होते कि, तुम्ही कुठे मराठवाड्यात आलात कि सांगा मला जाहीर कार्यक्रमात मला यायचे आहे. योगायोगाने आपली नागपूर भेटी नंतर ३ वर्षांनी सोलापूरला भेटण्याचा योग आला. शंकरराव मोहिते यांच्या नावे पुरस्कार वितरण होते. तिथे मुद्दाम मी आलो होतो. त्र्य. वि. सरदेशमुख यांच्या आग्रहाखातर तुम्ही हा साहित्य पुरस्कार स्वीकारलात. अंबरीश मिश्र आणि स्वत:हा त्र्य. वि. सरदेशमुख यांना पण त्यात पुरस्कार होते. तुमचे ते आवेश पूर्ण भाषण आईकून मी थक्क झालो. तुम्हाला धाप लागलेली. तुमची मांडणी कित्येकांना पटली किंवा नाही कि समजलेच नाही ही शंकाच. तुम्हाला अंबाजोगाईला बोलावणे जमले नाही पण तुम्ही चंद्रकांत काळे यांचा “साजणवेळा” हा कार्यक्रम घ्या. असे सुचवले. तसे तुम्ही काळे व माझे बोलणेही करून दिले. मी आणि हृदयनाथ मंगेशकर दोघेही अंबाजोगाईला येवून माझ्या कवितेचा कार्यकम करतो. तुम्ही हृदयनाथ यांच्याशी संपर्कात रहा, पण तेही जमले नाही. तुम्ही गेला. आणि मग त्याच वर्षी नोव्हेंबर २०१२ च्या “यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहात, चंद्रकांत काळे यांना बोलावले आणि तुमच्या कवितांचा “साजणवेळा” हा कार्यक्रम केला. हा कार्यक्रम चालू होता. तोच वाद्यवृंद, पं.आनंद मोडक, चंद्रकांत काळे, आणि त्यांचा चमू, धीरगंभीर पणे सगळे चालू होते लोक दाद देत होते, कधी शब्दांना, कधी रचनेला, कधी गायकीला, कधी काळे यांच्या निवेदनाला....पण माझे मन मात्र पुन्हा तुमच्या शेवटच्या ‘दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल’ मधल्या भेटीकडे गेले, ...तुम्ही साहित्य अकादमीचा पुरस्कार घेवून आलात. फोनवर दोनच शब्द बोललो, सर अभिनंदन!! आणि तुमचा आवाज इतका क्षीण होता कि, काळजाचा ठाव चुकला... हो, चुकलाच! तुम्ही फेब्रुवारीत तो पुरस्कार घेतला आणि मार्च २६ ला बातम्यात कळले, मराठीतील महान कवी ग्रेस गेले. मी गडबडीने चंद्रकांत काळेना फोन केला. तेंव्हा त्यानाही कळले नव्हते. मी म्हटले त्यांचा अंत्यविधी कुठे करणार एवढे कळवा. त्यानाही अंदाज आला नाही. मी पुण्याच्या दिशेने निघालो आणि तुमचा अखेरचा प्रबास नागपूरच्या दिशेने. मला कळलेच नाही काय करावे. तुमच्या शिवाय कोणी ओळखीचे नव्हते. जेंव्हा भेट झाले तेंव्हा तुम्ही एकटेच. पण तुमचे कांही मित्र माझे झाले होते. पुण्यात पावूल टाकले आणि बातम्या पहिल्या कवी ग्रेस यांचे नागपुरात अंत्यविधी होणार. माझी दिशा चुकली होती.आणि नागपूरला पोहचणे शक्य नव्हते. सायंकाळ, साजणवेळा, सांध्य, दिवेलागण, असे साम्य शब्द कानात पडत होते कितीं प्रिय शब्द होते ते तुम्हाला आणि किती प्रिय होते सूर्याचे अस्ताला जाणे आणि परत उगवणे. पण आज सूर्य काजळी लेवून गेला तो न परतण्या साठी. ....

मी भानावर आलो, अम्बाजोगाईचा कार्यक्रम संपत आला होता..
भय इथले संपत नाही.......
ती गेली तेंव्हा रिम झिम पाउस निनादात होता....
कसल्या दु:खाने सुचते हे गाणे...
आणि मग शेवटचे ...गीत मुकुंद फणसळकर यांच्या गंभीर आवाजात....
उठा दया घना लावा निरांजने. देहातले सोने काळे झाले.......!!
माझ्या डोळ्यात तुमची दिनानाथ मधली मूर्ती स्पष्ट पणे बोलतच आहे असा भास...हो, तो भासच होता....
या पुन्हा परत एवढेच सांगतो....
तुमचा
दगडू लोमटे

Friday, July 12, 2013

श्रध्येय साधनाताई आमटे यांना पत्र

श्रद्धेय साधनाताई आमटे,
सादर प्रणाम,
तुम्हाला आमच्यातून जाऊन आज ९ जुलै रोजी २ वर्ष पूर्ण होत आहेत. या दोन वर्षात तुमचे स्मरण झाले नाही असा दिवस निघत नाही. तुमच्या बद्दल असलेली आंतरिक ओढ ही कायम होती आणि आहे. मला माहित नाही पण, बाबांपेक्ष्या मला तुमच्या बदल जास्तीचा आदर, आणि प्रेम होते. तुम्ही आयुष्यभर घेतलेले अपार कष्ठ. दु:खी, कष्ठी, अनाथ, अबाल, वृद्ध, मुके, बहिरे, कुष्ठरोगी, पिडीत, वंचित, यांच्या बद्दलची प्रचंड आपुलकी, सहानुभूती, ममत्व, करुणा, आणि वात्सल्य तुमच्या रोमारोमात होते. म्हणून तुम्ही आणि बाबा मोठ विश्व उभा करू शकलात.
“समिधा” वाचताना तुमचे अवघे जीवन किती कष्ठातून गेले आहे हे लक्ष्यात येते,   बाबांसोबत चा संसार, आनंदवन उभे करण्या पासून ते  तुमच्या शेवटच्या श्वासा पर्यंत महारोगी सेवा समितीचा झालेला भव्य दिव्य विकास, लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा, अशोकवन, मुळगव्हाण पासून सारे प्रकल्प केवळ तुम्ही बाबा,डॉ.विकास, डॉ.प्रकाश,आणि बाबांच्या सर्व सहकाऱ्यांनी समाजाच्या गरजे पोटी आत्मीयतेने उभे केले. लोकांनी प्रामाणिक साथ दिली. अनेक मराठीच्या साहित्यिकानी, कलावन्तानी तुम्हाला व बाबांना मदत केली. त्यात पु.ल.देशपांडे, सुनिता देशपांडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले गेले. त्यांचा आणि तुम्हा उभयतांचा ऋणानुबंध कायम राहिला. ‘समिधा’ वाचताना तुम्ही घेतलेल्या सर्वव्यापी कामाचे, कष्टाचा आलेख तुम्ही मांडला आहे. बाबांबद्दल चे तुमचे प्रेम आणि तुमची त्यांना मिळालेली साथ प्रकर्षाने जाणवते.
ताई, तसा माझा आणि आनंदवन चा संपर्क आला तो मुळात तो १९८६ साली. १९८५ साली बाबांनी तरुणांना घेवून कन्याकुमारी ते काश्मीर अशी राष्ट्रीय एकात्मते साठी सायकल यात्रा काढायची ठरवले आणि अंबाजोगाईच्या शैला लोहिया यांच्या मुळे मला या यात्रेत जायला मिळाले. आणि तिथून मग आपला व आनंदवनचा संपर्क आला. पुढे अधून मधून आनंदवनला जाणे-येणे होतेच. पण सोमनाथ च्या श्रम संस्कार छावणी साठी मात्र मे महिन्याच्या त्या अति प्रचंड कडक उन्हात शिबिराला येत असे. पुढे बाबा आणि तुम्ही नर्मदेच्या बचाव साठी मध्य प्रदेशच्या बडवानी, कसरावद ला गेलात आणि ८-९ वर्ष फारसा संपर्क झाला नाही. मासळ’च्या प्रकल्प शुभारंभ प्रसंगी आणि तत्पूर्वी  बाबांच्या वयाला ७५ वर्ष झाली म्हणून हेमलकसा येथे  मोठा कार्यक्रम झाला. त्यात डॉ. प्रकाश चा ५० व वाढदिवस, डॉ.दिगंत म्हणजे पिल्लू चे वैद्यकीय शिक्षणपूर्ण झाल्या नंतर त्यानेही हेमलकसा येथेच काम करण्याचा निर्णय घेतला तो त्याचा लोकार्पण सोहळा असा त्रिवेणी संगम घडून आला होता. त्याचा साक्षीदार म्हणून मी तिथे हजर होतो. त्या नंतर आपली भेट झाली ती तुम्ही नर्मदे वरून परतल्यावरच. पण तुमच्या पश्च्यात  डॉ. विकास व डॉ.भारती यांनी आनंदवन आणि डॉ.प्रकाश व डॉ.मंदा  यांनी हेमलकसा येथील काम वेगवान केले होते.
२००५ नंतर माझे परत आनंदवनात जाने येणे वाढले, त्याचे कारण होते आपण परत आलात आणि स्वरांनदवन चे महाराष्ट्र तील प्रयोग. मी या ओर्केट्रा सोबत दौरा असलो कि जायचो. त्यातील अंध, अपंग, निरोगी कुष्ठरोगी, मुकबधीर मुलेमुली असा १२५ जणांचा चम्मू आणि त्याना या दौर्यात मदत करणे. पण आपल्या व आनंदवन च्या संस्काराने जे प्रेम, माया, आदर, ममत्व तुम्ही जागे केले होते, त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याची आपली उर्मी आम्हालाही बसू देत नव्हती. आम्हीच नव्हे तर आनंदवनात जे कोणी येत असे त्यांची आपण किती काळजी घेत असा ते तेंव्हा येण्यार्या व भेट देण्यार्या प्रत्येक पाहुण्यांना माहित आहे. कोण आले आहे, त्यांची निवास, भोजन, आणि इतर सोयी झाल्या की नाही हे आपण जातीने पहायच्या आणि कांही सूचना असतील तर त्या तुम्ही देत असा..किती बारकाईने तुम्ही हे काम करता हे मी पहिले आहे. त्यावरून तुमचे जगण्याची शैली समजून जाई..तुम्हाला आणि बाबांना पहाटे आणि सायंकाळी फिरण्याचे आणि गप्पांचे खूप वेड होते. नवे विचार आणि समाजासाठी आणखी काय करायला हवे हे चिंतन त्यात चाले. तुमच्या या कामाची दखल जगाने, देशाने आणि उभ्या महाराष्ट्राने घेतली. अनेक पुरस्कार बाबांना,  तुम्हालाही मिळाले. पण तसूभरही गर्व तुम्हाला आला नाही. हे महत्वाचे. तुम्ही कामाला आधीक महत्व दिले.
२००७ नंतर २-३ महिन्यातुन एकदा असे माझे आनंदवनला जाने येणे वाढले होते. बाबा २००८ साली गेले त्यानंतर जेंव्हा जेंव्हा मी तुम्हाला भेटायला आलो तेंव्हा आग्रहाने तुमच्या सोबत सायंकाळी फिरायला यायचो. माझ्या सोबत फिरायला येतोका? आस तुम्ही विचारल कि, आनंदाने मी तुमच्या सोबत यायचो. अनेक वेळा तुम्ही माझ्या साठी ३-४ मिनिटे वाट पाहत थांबलेल्या आहात. मला खूप अस्वस्थ व्हायचे, कि साधनाताई या कर्तृत्वाने किती मोठ्या आणि किती साधे पणाने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी साठी वाट पाहत थांबत असत. असेच एकदा मी आनंदवनला आलो होतो. अमेरिकेतून चंदा आठल्ये आल्या होत्या त्या दर वर्षी अमेरिकेतून भारतात आल्या कि आनंदवनला यायच्या. आज फिरायला तुमच्या  सोबत मी, चंदा आठल्ये, नेहमीचे नामदेव आणि कोणी तरी एक बाई सोबत होती. हल्ली तुम्ही गाडीने जायचा. पायी चालणे बंद झाले होते. मग संपूर्ण आनंदवन चा फेरफटका. फेरफटका मारताना तुम्ही सोबत चोलकेट, किंवा मुलांसाठी खावू ठेवायचात, मग गाडी जवळ आली कि मुल ताई, आजी नमस्कार म्हणून अदबीने हात पुढे करायची आणि मग तुम्ही त्याला कांही तरी बोलून हसवायचात, आणि मग ते चोकलेट हातात पडल्यावर त्या मुलांना काय आनंद व्हायचा,ते त्यांचे हास्य आजही आठवते, फिरायचे वेळी रस्त्याचा दोन्ही बाजूला आनंदवनचे कार्यकर्ते, कुष्ठरोगी, मुकबधीर मुले,अंध मुले-मुली अदबीने तुम्हाला नमस्कार करायची, तुमची गाडी दिसली, किंवा आवाज आला कि लोक हात जोडून उभे असायची. हा केवढा आदरभाव, सन्मान होता, ताई. तुम्हीही गाडी थांबवून कधी, चालत्या गाडीतून ख्याली, खुशाली विचारायचात. असे करत करत, मग बाबांच्या समाधीचे दर्शन, समाधीला दिवा-वात करणे आणि निघणे. आज तुम्ही गाडी खाली उतरला नव्हता. तेवढेही त्राण राहिले नव्हते., मग मी चंदा आठल्ये आणि नामदेव ने बाबांच्या समाधीला फुले वाहिली, दिवा बत्ती केले आणि परतलो. मी माझ्या रूमवर लोटीरमणला गेलो. तेवढ्यात तुमचा सांगावा घेवून नामदेव आला. ताईनी बोलवले आहे जेवायला. तुमची मेस उत्तरायण. तुम्ही शेवट पर्यंत इथेच जेवण घेतले, सर्वांसोबत सामुहीक. तुमचा निरोप येताच मी धावत आलो तर खुद्द तुम्ही, आनंदवनचे विश्वस्त नरेंद्र मेस्त्री, चंदा आठल्ये आणि इतर सर्व तिथे होते. सर्वांची ताटे तयार होती आणि तुम्ही चक्क माझी वाट पाहत होता. मी किती भरून पावलो, ताई माझ्या साठी जेवायचे थांबल्या....! पण यात तुमचे किती मोठे पण होते तो लपून राहिला नाही. तुम्ही सहज घेतले पण मी आजही विसरलो नाही.
तुमची जगण्याची जिद्द आणि संकटावर मात करण्याची प्रबळ इच्छा याला तोड नव्हती. शेवटच्या टप्प्यात तुम्ही अन्न वर्ज्य केले नाही पण खाण्याचे प्रमाण कमी केले, “शरीर आपल्या हातून गेले कि जगण्यात काय अर्थ  आहे” हे तत्वज्ञान तुम्हीच आम्हाला सांगितले. अश्या परस्थितीत तुमच्यावर कर्क रोगाने घाला घातला. नागपूरच्या  दवाखान्यात तुमच्यावर शास्राक्रिया झाली. मी भेटायला आलो, तसे अनेक जन भेटले, त्या सगळ्यांना तुम्ही जातीने अश्याही अवस्थेत चहा द्या, पाणी द्या, जेवण झाले का? कुठे थांबला,कधी आलात? कधी जाणार? असले प्रश्न विचारत होता. तुमचा वाढदिवस इथेच नागपूरला दवाखान्यात साजरा केला तो शेवटचा होता. सारे आमटे कुटुंबीय यावेळी एकत्र होते.....
तुम्हाला मी दवाखान्यात न्याहाळत होतो, आणि  मला एकदम १ छायाचित्र आठवले, तुम्ही १ अनाथ मुलीची वेणी करतानाचा. त्यात तिचा आणि तुमचा चेहरा किती फुललेला आहे आनंदाने. किती भाग्य या मुलीच्या वाट्याला आले होते, हे असे प्रेम, ममत्व मिळण्यासाठी मी का अनाथ, अंध, मुकबधीर, कुष्ठरोगी झालो नाही? असा प्रश्न पडला....मी जरा गंभीर झालो. पण तुमचे प्रेम हे असेच सर्वत्र पसरलेले होते, सगळे तुमच्या प्रेमात नाव्हून गेले होते. पण मी हे ही  अनुभवले कि तुमचा, तुमच्या हातातल्या काठीचा दरारा आणि आदर केवढा मोठा होता.
तुम्ही अंबाजोगाई ला यावे या साठी कांही तरी कार्यक्रम आयोजित करण्याचे मी ठरवीत होतो. बाबांना न्यावे असे वाटत होते, पण त्यांनी जे काम हातात घेतले होते, ते सोडून त्यांना इथे बोलावणे शक्य नव्हते. नंतर तर त्यांची तबेत बरीच खराब झाली. नंतर त्यातच त्यांचे निधन झाले. मग २५ व्या रौप्य महोत्सवी यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या समारोपात तुम्ही पाहुणे म्हणून यावे व तुमच्या हस्ते त्यातले पुरस्कार देण्याचा घाट तुम्हाला मी घातला. तुमचे वय, तुम्हाला असलेले पथ्य – पाणी, हे सगळे मला मान्य होते, पण तुमचा देवावर असलेला विश्वास,आणि श्रद्धा यावर माझा विश्वास होता, आणि तुम्हाला अंबाजोगाई च्या योगेश्वरी देवी चे दर्शन घडवावे, तिथून अक्कलकोट ला स्वामीच्या दर्शनाला जावूत असे म्हटल्यावर तुम्ही किती चटकन तय्यार व्हाल अशी अपेक्षा होती पण तुम्ही चक्क नकार दिला. मी माझे गांधीयन अश्र काढले, मी तुम्ही हो म्हणे पर्यंत, जेवणार नाही आणि आनंदवनातून वापस जाणार नाही असा हट्ट घरला. सुधाकर कडू, डॉ. पोळ, प्रभू,सदाशिव ताजने आणि अन्य लोकांनी  तुम्हाला विनंती केली, माझ्या बद्दल तुम्हाला आपुलकी होती आणि जेंव्हा डॉ.विकास, कौस्तुभ, आमटे कुटुंबीयांनी अंबाजोगाई ला जाण्याची परवानगी दिली आणि तुम्ही अंबाजोगाई ला आलात हे संपूर्ण महाराष्ट्राला समजले तेंव्हा तुमच्या साठी वर्षानु वर्ष आमच्याकडे या असा आग्रह करण्यार्यानी आश्चर्य व्यक्त केले.आणि तोंडात बोटं घातली. अंबाजोगाईतही लोक ३ रे आश्चर्य म्हणू लागले. तुम्ही आलात, देवीचे दर्शन झाले. यशवंतराव चव्हाण कधी काळी आनंदवनला येवून गेले होते तो धागा पकडून तम्ही छोटेसे भाषण केले. आणि भाषणात “मला अंबाजोगाई ला आणले या बद्दल दगडू ला नोबेल दिले पाहिजे” असे जाहीर सांगितले. तुमच्या हस्ते पुरस्कार दिले गेले. ज्या हाताने पुरस्कार घेण्याचेच काम केले त्या हातानी पुरस्कार प्रदान केले. केवढे आमचे भाग्य होते, जाताना तुम्ही न थांबता अंबाजोगाई ते आनंदवन असा ५०० किलोमीटरचा टप्पा पार करून तुम्ही सगळ्यांना चकित केले. ८५ व्या वर्षी ही तुमची व्हीलपावर आजच्या पिढीला काय संदेश देवून जाते? अनंत उपकार तुमचे माझ्या वर आणि अंबाजोगाईकर यांच्या वर झाले.....!
 आता तुमची तबेत बरीच खालावली होती, तुम्ही अन्न पाणी फारच कमी केले होते, असे निरोप अधून मधून येत. मी महिन्याला तुम्हाला भेटायला येत होतोच, आणि ७ जुलै ला तुम्हाला आनंदवनला भेटून परत अंबाजोगाईला आलो आणि ९ जुलै रोजी तुम्ही गेलात असे समजले. तत्काळ आनंदवन निघालो, अनेक पट डोळ्यातून पुढे सरकत होते, तुमचे निरागस, दु:खी, कष्ठी, अंध, अपंग, मूक, अनाथ लोकांसाठी साठी जे कष्ठ  घेतले, त्यांना ममतेने वागविले, माणूस म्हणून उभा केले. त्यांच्या डोळ्यात तुमच्या आठवणीचे पाणी तरळणारच ना....
आणि हो, तुम्ही अनेक दगडांचे मैल मागे ठेवून गेलात. कित्येक अनाथ मुले तुम्ही आनंदवनात प्रत्येक कुटुंबात दिलेत सांभाळायला. आम्ही केत्येक वर्ष तिकडे आलो पण असे कधी कुठे जाणवले नाही कि हि मुले कधी काळी आईवडिलांची छ्याया  गमावून बसले होते. इतके सहज त्यांना आनंदवनातील या पाल्यांनी नुसते सांभाळे नाही तर त्यांना शिकविले, चांगले शिकविले कि, आज ते वेगवेगळ्या पदांवर नौकरी ला आहेत, अनेकांची लग्न झाली, सुखी संसार चालू आहे, बाळ गोपाळ त्यांचा घरात खेळत आहेत, पण तुमचा हात या बाळांच्या डोक्यावरून फिरावा हे स्वप्न आता स्वप्नच राहिले... तुम्ही गेलात....आणि पोरके पणा काय असतो?  हे आम्ही आणि आनंदवन मधली मंडळी अनुभवले,अनुभवत आहोत.
तुमची आठवण, आता आठवणच आहे.... असे वाटते कि तुम्ही कुठून तरी मागून येणार, आणि मिश्कीलपणे काठी उगारणार आणि मग हसून पाठीवर हात फिरवून विचारणार, कधी आलास? कधी जाशील?, कुठे थांबलास? जेवलास का?
आम्ही आता तुमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाण्याने डबडबलेल्या डोळ्यातून, अंधुकश्या नजरेने पाहत बसतो......या लवकर परत अशीच हाक देतो.
तुमचा

दगडू लोमटे.

Monday, July 1, 2013

ब्रम्हपुत्र

ब्रम्हपुत्र 
सादर प्रणाम,

तुझे रूप, आकार, आणि व्याप्ती मला माहित आहे, तुझा जन्म,मला कळत नसला तरी माझ्या जन्मा पासून मी तुला छ्यान समजून आहे. पाहत आहे. तुला असे वाटते का कि तू तुझा प्रवाह बदल्तेस, लोकांना हैराण करतेस? कितेकाचे संसार आपल्या कवेत घेवून तू तशीच बिनधास्त निघून जातेस. कितेकांना तू उघड्यावर टाकतेस, तरी कोणीही तुला श्राप देत नाही. सहज तुला समजून घेतात, तुझ्या घाईचा काळ म्हणजे संबंध भारत पावसाची वाट पाहतो, आणि तिकडे तू आसाम मध्ये धुमाकूळ घालतेस. गावच्या गाव आणि शहरेही तू विक्स्टून टाकतेस. तरीही तुझ्या काठावरची लोक तुला पंचारती घेवून तुझ्या स्वागतला उभे असतात, कितेक गायक, वादक तुझ्या काठावर एकाग्र होवून आपला रियाझ करतात, ब्रम्ह्पुत्रा तू आहेसच अशी, तुझा नावलोकिक आईकून आणि वाचून मी खूप आकर्षिला गेलो. तुला भेटावे म्हणून आस धरली होती मनात. मग तसा योग आला १४ वर्षा पूर्वी. मला जायचे होते मेघालयात तर तुझे दर्शन घेतल्या शिवाय कुणालाच मेघालयातच नव्हे तर संबंध पूर्वोत्तर राज्यात हि जायचे असेल तर तुझे दर्शन अनिवार्य आहे. तुला टाळून कुणालाच जावेसे वाटत नाही. तुझे आकर्षण आज ही अबाधित आहे. तू आमच्याशी कशीही वागलीस तरी आम्ही तुझे अपार उपकार मानतो. मग तुझ्या त्या आक्राळ विक्राळ रूपाचे प्रथम दर्शन झाले ते गोहात्तीत जाताना रेल्वे पुला वरून. अगोदर वाटले कुठला समुद्र आहे कि काय? पण तुझा तो संथ गतीने वाहण्याचा काळ. तुझ.निळशार पाणी पाहून मन प्रसन्न आणि धन्य झाल.जिच्या भेटीची आपण आस धरली होती ती ब्राम्ह्पुत्रा माझ्या डोळ्यात मावत नव्हती. पाहता पाहता तुला आम्ही पार केले, पण तुझा स्पर्श कधी होईल हि भावना मनात घर करून राहिली. पावसाळ्यात तुझ रूप किती वेगळ, माती, दगड,आणि कितीतरी मैला तू सोबत घेवून वेगाने जातेस तेंव्हा तुला पाहायला बरे वाटते पण मनात तू थांबत नाहीस. पावसाळा सोडून जेंव्हा नितळ,आणि संथ वाहतेस तेंव्हा तुला सोडवत नाही. तुझा स्पर्श झाला तो गोहात्तीच्या काठावर. किती छ्यान होता तुझा तो स्पर्श. आजही जाणवतो, मी परतलो तेंव्हा मला परतणे अनिवार्य होते...........
१५ वर्ष नंतर तुला पाहण्याचा मोह सुटला, विरह माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्याची आर्तता साद घालत असते. तुला पाहण्या साठी जीव आतुर झाला होता. तसे भारतात अनेक नद्या आहेत कि, मी पूर्वी, गंगा, कावेरी, कृष्णा, नर्मदा, तुंगभद्रा, बियास या नद्या पहिल्या आहेत. पण तुझे आक्राळ विक्राळ रूप मला खूप आवडते, वेड लावते. म्हणून तुला परत भेटावे या साठी परत तुझ्या दिशेने निघालो. तुझे आकाश्यातून कसे रूप आहे हे पाहण्याचा योग आला, बांगला भागातून तुला पाहताना एक विहंगम असा तुझ्या सौंदर्याचा नजारा आणि आणि गोहाटीच्या जवळ आल्यावर तुझे डोळ्यात न मावणारे रूप.....आज मात्र तू खूप शांत वाटत होतीस. १५ वर्षा पूर्वी तू किती ओथंबून वाहात होतीस. पण आता काय झाले तुला? किती खोल खोल गेली होतीस. पण वरच्या आसाम मध्ये गेलो तर तू गोहातीत खोल आणि इकडे धेमाजी-दिब्रुगड या दरम्यान तुला मी नावेतून ३ तास पार करत होतो. किती नितळ, निश्चयी, खोल आणि संथ होतीस. हे तुझे रूप मला गोहाटी पेक्ष्या जस मोहक वाटले. तुझी निळाई आणि खोली किती सुंदर होती. नावाड्या नाव हाकत होता. एक मोठी हाक त्याला द्यावी आणि मनसोक्त तुला पाहून घावे असे वाटेले.... क्षणात मी गोंधळलो.. नको. तुला त्या फेरी बोटीतून न्याहाळत न्याहाळत मी दिब्रीगड च्या बाजूने काठावर आलो. तुला स्पर्शावे असा विचार मनात येताच मी तुझ्या कवेत पाण्यात शिरलो. किती  थंड आणी आल्हाददायी अनुभव होता, असेच तासंतास बसून राहावे असे वाटले .तू तुझ्या प्रवाहाच्या झोतात दिशा बदल्तेस, तुझ्या वेगवान प्रवाहात तू कित्येक माणसाना, घरादाराना, घेवून अनेकांना पोरके करतेस या वर विश्वास बसत नव्हता. पण तुला पार करताना अनेक खुणा साक्ष देत होत्या. हे ब्रम्ह्पुत्रे, तू हवी आहेस आणखी कित्येक लाख वर्ष आम्हाला, तूच तारणार आणी मारणार आम्हाला.. तूच आमची माया, ममता, आणि तारणहार. तुझे रूप आणि तुझा रुद्र अवतार हवा हवा वाटणारा, जरा आमच चुकतंय, कांही हजारो वर्ष झाले चुकतंय. त्याची शिक्षा
आम्ही भोगतोय.  तू अशी रागावू नको,
मी आता परत जातोय. माहित नाही आता तुझी नी माझी भेट कधी होईल ती, पण तुझ्या साठी माझा जीव व्याकूळ होतो, होता आला आहे, आणि आताही व्याकुळच आहे. तुझे पावित्र्य अबाधित राहावे म्हणून तुला कोणी टाकून बोलू नये या साठी तूच आता तुझा अवतार जरा आवरता घेता येतो का ते पहा,
जातो मी.....पुन्हा भेटीची आस धरून..... आता जाताना, तुझा स्पर्श, तुझे हे बिगर मोसमी सुंदर रूप आणि आकाशाची निळाई तुझ्या अंगावर अशीच पसरून असुदे.....ती आजन्म डोळ्यात ठेवीन...आठवण आली की, मी आभाळाच्या निळाईकडे पाहीन......
तुझा सदैव चाहता....

दगडू  लोमटे